मी मागील आठवड्यात बीडला कार्यक्रमासाठी गेलो होतो तेव्हा जातांना जामखेड मार्गे गेलो व येतांना पाथर्डी मार्गे ( विशाखापटटण महामार्ग) आलो . सांगायचे तात्पर्य मला कुठेही हिरवे गावात दिसले नाही कि कुठे पाणी दिसले नाही . मोठमोठे तलाव दिसत होते परंतु त्यात पाण्याचा थेंबही नव्हता . तापमान ४१ अंशापर्यंत गेलेले . रस्त्याने कुठेही पाखरे दिसली नहित. रस्त्यावर माणसे दिसत नव्हती …… कुठेतरी एखादा मजूर मनुष्य रस्त्याने विमनस्क अवस्थेत जातांना दिसत होता . १९७२ च्या दुष्कालापेक्षाही या वर्षीच्या दुष्काळाची तीव्रता फार आहे . विशेष करून मराठवाड्यात जास्त आहे . बीड परिसरातील काही लोक मुंबईला निघून गेले आहेत कारण येथे हाताला काम नाही शेते ओसाड पडली सरकार फार काही करते असे नाही . सर्व सामान्य लोक तर सरकारवर नाराज आहेत . सत्तेतील लोक म्हणतात " या लोकांना फुकट घ्यायची सवय लागली आहे ." अरे ! पण साधी गोष्ट आहे ज्या भागात पाणी नाही, हाताला काम नाही, जिथे पशु पक्षीही राह्यला तयार नाहीत तिथे माणसांची गोष्ट किती भयानक आहे . ६-७ परस खोल विहिरीत छोटे छोटे मुले जीव मुठीत धरून पाण्यासाठी उतरतात आणि विहिरीच्या तळाशी असलेले " चुल्लूभर " पाणी छोट्या वाटीने भरतात . अर्धा ते एक तास हा प्रकार केल्यानंतर एक हंडा भरतो व विहिरावर कमीत कमी १००-२०० लोकांची रांग लागलेली तेही बरेचसे वृध्द कारण त्यांना गांव सोडता आलेला नाही . त्यांचे उदासवाणे चेहरे भेडसावतात . भविष्यात काय लिहिले हे कोणालाच माहित नाही . छावण्या कुठे कुठे दिसतात पण त्यातही कडक नियमावलीमुळे जास्त छावण्या नाहीत . चोरून लपून नाही म्हटले तरी काही जनावरे कसायाच्या तावडीत जात अहेत. शेतकरी आत्महत्या करीत अहेत. त्याचाही काही नेते , पुढारी, समाज सुधारक (?) सिने अभिनेते तुटपुंजी मदत करून, शेतकऱ्यांच्या विधवा स्त्रियांना मदतीचा चेक देऊन छानपैकी फोटो काढून पेपरमध्ये छापून आणतात हि मोठे दयनीय अवस्था आहे सरकार म्हणते ," शेतकऱ्यांना आम्ही आधी सक्षम करू मग त्यांना कर्जच काढण्याची गरज राहणार नाही " हे एक वेळ खरे मानले तरी सध्याची स्थिती तसी नाही शेतकरी पार खचून गेला आहे . शेततळे अगोदर तुम्ही तयार करा मग आम्ही तुमच्या खात्यावर पैसे जमा करू ." लाल फितीतील कारभार तर जगजाहीर आहे . भ्रष्टाचारामध्ये भारत वरच्या क्रमांकावर आहे . कार्यलयात शेतकऱ्याला काय किमत आहे हे सर्वांनाच माहित आहे . अल्प भू धारक शेतकर्यासाठी खरेच " आरक्षणाची " गरज आहे . पण ! (?) शेतकऱ्याचा विचार करायला वेळ नाही . वर त्याला "बळी राजा "म्हणायचे . तो तर केव्हाच पाताळात घातला आहे , "तुका म्हणे बळी । जीव दिला पायातळी ।।" "उत्तम शेती, मध्यम व्यापार ,आणि कनिष्ट नोकरी " हि म्हण ज्याने कोणी सुरु केली त्याने काय विचार केला असेल त्याचे त्यालाच माहित पण ! आज मात्र उलट झाले आहे शेती कनिष्ट झाली आहे . शेतकऱ्याच्या मुलाला मुलगीहि देण्याचे धाडस कोणी करीत नाही . अशा अनेक अडचणी आहेत .
जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या काळात सलग बारा वर्षे दुष्काळ पडला होता . पण तेव्हा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आढळत नाही . कारण " योजकस्तत्र दुर्लभ: ।।" योजना करणारा दुर्लभ असतो . त्यावेळी तुकाराम महाराज हे मोठे पिढीजात सावकार होते , बारा बैलाची दावण होती , पनवेलपर्यंत त्यांचा व्यापार होता गडगंज श्रीमंत होते . धान्याची कोठारे होते. आणि अशा या दुष्काळात महाराजांचे हृदय द्रवले "न घडे यावरी न धरवे धीर । पीड्ता हे राष्ट्र देखोनि जग ॥३॥" आणि त्यांनी एक धाडशी निर्णय घेतला . धाकटा भाऊ " कान्होबा " याला बरोबर घेतले आणि दोघे भाऊ इंद्रायणीच्या तीरावर बसले आणि एक विचाराने निर्णय घेतला कि सर्व शेतकऱ्यांची कर्ज खाते फाडून टाकायची आणि दुसर्याच दिवसी सर्व गोर गरिबांना बोलावून घेतले व त्यांच्या देखत सर्व कर्ज खाते इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकली . व्याजासगट मुद्दल माफ करून टाकले . व स्वत:च्या कोठारातून सर्वांना धान्य वाटून टाकले . सर्व तळागाळातला समाज सुखी झाला . विशेष म्हणजे जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे हे कृत्य बघून छत्रपती शिवरायांनी सुद्धा संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांचा शेतसारा माफ केला शिवाय पेरणीच्या वेळी व्यापार्यांना शेतकऱ्यांना बियाणे मोफत देण्यास प्रवृत्त केले व त्याचे पैसे राजकोषातून अदा केले . हि होती राजनीती आणि धर्मनीती .
तात्पर्य आपण इतिहास विसरलो आणि त्यामुळे प्रजा सुद्धा शासनावर नाराज होऊ शकते व त्याचा परिणाम पुढील निवडणुकीत दिसू शकतो . पण ! राजकारणी मोठे धूर्त असतात शेवटच्या दिवसात सगळे माफ करतील आणि लोकमत पुन्हा आपल्याकडे वळवतील …… हे सृष्टी चक्र असेच चालू राहील आणि नंतर मात्र पश्चातापालाही जागा राहणार नाही .
दुष्काळ पुन्हा येऊ नये असे वाटत असेल तर प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावले पाहिजे " वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे ।" हे आम्ही फक्त म्हणतो पण बेसुमार वृक्ष तोड आपणच करतो त्यासाठी आपण एक केले पाहिजे घरी वेगवेगळ्या फळांच्या बिया जमा कराव्यात आणि बाहेर कुठेही निघालो कि जवळ एखादे खुरपे किंवा तत्सम काहीतरी ठेवावे आणि डोंगरात, रस्त्याच्या कडेला पाऊस सुरु झाला कि ते बीज लावावे त्यायोगेच वृक्षराजी पुन्हा बहरेल आणि वेळेवर पाऊसहि येईल . रोग व्हायच्या आधी काळजी घेतली तर रोग होत नसतो . तेव्हा आता हि नुसती सरकारची जबाबदारी राहिली नाही तर प्रत्येक नागरिकाची आहे . पोटाच्या लेकारासारखे झाडाला जपले तरच तुम्हाला निसर्ग सांभाळील अन्यथा वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यात सुद्धा काही अर्थ नाही "पश्च्यात म्हणजे नंतर , नंतरचा ताप " तेव्हा मित्रांनो सावध व्हा आणि एक तर झाड लावा .
रामकृष्ण हरी ।
जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या काळात सलग बारा वर्षे दुष्काळ पडला होता . पण तेव्हा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आढळत नाही . कारण " योजकस्तत्र दुर्लभ: ।।" योजना करणारा दुर्लभ असतो . त्यावेळी तुकाराम महाराज हे मोठे पिढीजात सावकार होते , बारा बैलाची दावण होती , पनवेलपर्यंत त्यांचा व्यापार होता गडगंज श्रीमंत होते . धान्याची कोठारे होते. आणि अशा या दुष्काळात महाराजांचे हृदय द्रवले "न घडे यावरी न धरवे धीर । पीड्ता हे राष्ट्र देखोनि जग ॥३॥" आणि त्यांनी एक धाडशी निर्णय घेतला . धाकटा भाऊ " कान्होबा " याला बरोबर घेतले आणि दोघे भाऊ इंद्रायणीच्या तीरावर बसले आणि एक विचाराने निर्णय घेतला कि सर्व शेतकऱ्यांची कर्ज खाते फाडून टाकायची आणि दुसर्याच दिवसी सर्व गोर गरिबांना बोलावून घेतले व त्यांच्या देखत सर्व कर्ज खाते इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकली . व्याजासगट मुद्दल माफ करून टाकले . व स्वत:च्या कोठारातून सर्वांना धान्य वाटून टाकले . सर्व तळागाळातला समाज सुखी झाला . विशेष म्हणजे जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे हे कृत्य बघून छत्रपती शिवरायांनी सुद्धा संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांचा शेतसारा माफ केला शिवाय पेरणीच्या वेळी व्यापार्यांना शेतकऱ्यांना बियाणे मोफत देण्यास प्रवृत्त केले व त्याचे पैसे राजकोषातून अदा केले . हि होती राजनीती आणि धर्मनीती .
तात्पर्य आपण इतिहास विसरलो आणि त्यामुळे प्रजा सुद्धा शासनावर नाराज होऊ शकते व त्याचा परिणाम पुढील निवडणुकीत दिसू शकतो . पण ! राजकारणी मोठे धूर्त असतात शेवटच्या दिवसात सगळे माफ करतील आणि लोकमत पुन्हा आपल्याकडे वळवतील …… हे सृष्टी चक्र असेच चालू राहील आणि नंतर मात्र पश्चातापालाही जागा राहणार नाही .
दुष्काळ पुन्हा येऊ नये असे वाटत असेल तर प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावले पाहिजे " वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे ।" हे आम्ही फक्त म्हणतो पण बेसुमार वृक्ष तोड आपणच करतो त्यासाठी आपण एक केले पाहिजे घरी वेगवेगळ्या फळांच्या बिया जमा कराव्यात आणि बाहेर कुठेही निघालो कि जवळ एखादे खुरपे किंवा तत्सम काहीतरी ठेवावे आणि डोंगरात, रस्त्याच्या कडेला पाऊस सुरु झाला कि ते बीज लावावे त्यायोगेच वृक्षराजी पुन्हा बहरेल आणि वेळेवर पाऊसहि येईल . रोग व्हायच्या आधी काळजी घेतली तर रोग होत नसतो . तेव्हा आता हि नुसती सरकारची जबाबदारी राहिली नाही तर प्रत्येक नागरिकाची आहे . पोटाच्या लेकारासारखे झाडाला जपले तरच तुम्हाला निसर्ग सांभाळील अन्यथा वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यात सुद्धा काही अर्थ नाही "पश्च्यात म्हणजे नंतर , नंतरचा ताप " तेव्हा मित्रांनो सावध व्हा आणि एक तर झाड लावा .
रामकृष्ण हरी ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा