जय हरी ।
जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचा अभंग गाथा एव्हढेच वाङ्मय आपल्याला माहीत आहे पण !तुकाराम महाराजांचे आणखीही काही साहित्य आहे जे की काळाच्या ओघात लुप्तप्राय झाल्यासारखे आहे . जरासे माउलींनी भगवत गीतेवर भाष्य लिहले , नाव ज्ञानेश्वरी अगदी त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांनी सुद्धा "मंत्र गीता " किंवा अभंग गीता नावाचा ग्रंथ लिहला आहे भगवत गीतेच्या श्लोकावर अभंगरूपात महाराजांनी भाष्य लिहले आहे . हाच ग्रंथ तुकाराम महाराजांची अनुग्रहित शिष्या संत बहिणाबाई पाठक यांनाही हाच ग्रंथ दिला होता . . स्वतः: बहिणाबाईंनी त्यांना तुकाराम महाराजांनो कसा अनुग्रह दिला व मंत्र गीता दिली याविषयी अभंग लिहला आहे .
बहुत अंतरी शोक आरंभिला । का मज विठ्ठला मोकलिले ।।१।।
त्रिविध तापाने तापले मी बहु । जाईना का जीवु प्राण माझा ।।२।।
ताव अकस्मात सातव्या दिनी ।नामसंकीर्तनी घोषयुक्त ।।३।।
तुकाराम रूपे येवोनि प्रत्यक्ष । पूर्वपक्ष सांभाळिजे ।।४।।
नको करू चिंता मी तुजपाशीं ।घेई अमृताशी हातिचिया ।।५।।
गाय केले वत्स मुखी निघे धार । अमृत हे सार सेवी हेचि ।।६।।
ठेवोनिया कर मस्तकी बोलिला । मंत्र सांगितला कर्णरंध्री ।।७।।
म्या ही पायावरी ठेविले मस्तक । दिधले पुस्तक "मंत्र गीता" ।।७।।
कार्तिक वद्य पंचमी रविवार । स्वामींचा विचार गुरुकृपा ।।८।।
आनंदले मन चिदरूपी कोंदले । उठोनि बैसले चमत्कारे ।।९।।
मंत्र पाठविती तुकोबास्वरूपा । स्वप्नामाजी कृपा पूर्ण केली ।।१०।।
अमृत पाजिले चवी अनारीसी । साक्ष ज्याची त्याची मनामाजी ।।११।।
बहिणी म्हणे ऐसी कृपा सद्गुरूची । तुकाराम साची पूर्ण केली ।।१२।।
तात्पर्य पूर्वी असे होते की ब्रह्मसूत्र, उपनिषदे, भगवतगीता या प्रस्थान त्रयीवर भाष्य केली त्यांना जगद्गुरू , आचार्य पद प्राप्त होत होते विषय तो नाही पण जसे माउलींनी गीतेवर ओवीरुपात भाष्य लिहले तसेच मराठीमध्ये अभंग या छंदांमध्ये तुकाराम महाराजांनी " मंत्र गीता " नावाचे गीतेवर भाष्य लिहले आहे भगवत गीतेच्या प्रत्येक श्लोक महाराजांनी अभंग लिहलेले आहेत . हे अभंग " गीतार्थ कोष " नावाचा एक ग्रंथ आहे त्यामध्ये आहे . हा ग्रंथ संग्राहक श्री दिनकर विनायक भिडे यांनी संपादित केला आहे . वंदे मातरम फाऊंडेशन , मुंबई यांनी तो प्रकाशित केला आहे . परंतु जसा गाथा प्रसिद्ध झाला तशी ही मंत्र गीता प्रसिद्ध का होऊ शकली नाही ? किंवा वारकरी संप्रदायात या मात्र गीतेचा प्रचार का होऊ शकला नाही ? का जाणीवपूर्वक हा ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचूच द्यायचा नाही की काय ? हे मला सतत आश्चर्य वाटत आलेले आहे . बरे ही मंत्र( अभंग) गीता माझ्या पाहण्यात पण आहे . वारकरी संप्रदायातील अनेकांना हा ग्रंथ माहीतही नाही .
जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचा अभंग गाथा एव्हढेच वाङ्मय आपल्याला माहीत आहे पण !तुकाराम महाराजांचे आणखीही काही साहित्य आहे जे की काळाच्या ओघात लुप्तप्राय झाल्यासारखे आहे . जरासे माउलींनी भगवत गीतेवर भाष्य लिहले , नाव ज्ञानेश्वरी अगदी त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांनी सुद्धा "मंत्र गीता " किंवा अभंग गीता नावाचा ग्रंथ लिहला आहे भगवत गीतेच्या श्लोकावर अभंगरूपात महाराजांनी भाष्य लिहले आहे . हाच ग्रंथ तुकाराम महाराजांची अनुग्रहित शिष्या संत बहिणाबाई पाठक यांनाही हाच ग्रंथ दिला होता . . स्वतः: बहिणाबाईंनी त्यांना तुकाराम महाराजांनो कसा अनुग्रह दिला व मंत्र गीता दिली याविषयी अभंग लिहला आहे .
बहुत अंतरी शोक आरंभिला । का मज विठ्ठला मोकलिले ।।१।।
त्रिविध तापाने तापले मी बहु । जाईना का जीवु प्राण माझा ।।२।।
ताव अकस्मात सातव्या दिनी ।नामसंकीर्तनी घोषयुक्त ।।३।।
तुकाराम रूपे येवोनि प्रत्यक्ष । पूर्वपक्ष सांभाळिजे ।।४।।
नको करू चिंता मी तुजपाशीं ।घेई अमृताशी हातिचिया ।।५।।
गाय केले वत्स मुखी निघे धार । अमृत हे सार सेवी हेचि ।।६।।
ठेवोनिया कर मस्तकी बोलिला । मंत्र सांगितला कर्णरंध्री ।।७।।
म्या ही पायावरी ठेविले मस्तक । दिधले पुस्तक "मंत्र गीता" ।।७।।
कार्तिक वद्य पंचमी रविवार । स्वामींचा विचार गुरुकृपा ।।८।।
आनंदले मन चिदरूपी कोंदले । उठोनि बैसले चमत्कारे ।।९।।
मंत्र पाठविती तुकोबास्वरूपा । स्वप्नामाजी कृपा पूर्ण केली ।।१०।।
अमृत पाजिले चवी अनारीसी । साक्ष ज्याची त्याची मनामाजी ।।११।।
बहिणी म्हणे ऐसी कृपा सद्गुरूची । तुकाराम साची पूर्ण केली ।।१२।।
तात्पर्य पूर्वी असे होते की ब्रह्मसूत्र, उपनिषदे, भगवतगीता या प्रस्थान त्रयीवर भाष्य केली त्यांना जगद्गुरू , आचार्य पद प्राप्त होत होते विषय तो नाही पण जसे माउलींनी गीतेवर ओवीरुपात भाष्य लिहले तसेच मराठीमध्ये अभंग या छंदांमध्ये तुकाराम महाराजांनी " मंत्र गीता " नावाचे गीतेवर भाष्य लिहले आहे भगवत गीतेच्या प्रत्येक श्लोक महाराजांनी अभंग लिहलेले आहेत . हे अभंग " गीतार्थ कोष " नावाचा एक ग्रंथ आहे त्यामध्ये आहे . हा ग्रंथ संग्राहक श्री दिनकर विनायक भिडे यांनी संपादित केला आहे . वंदे मातरम फाऊंडेशन , मुंबई यांनी तो प्रकाशित केला आहे . परंतु जसा गाथा प्रसिद्ध झाला तशी ही मंत्र गीता प्रसिद्ध का होऊ शकली नाही ? किंवा वारकरी संप्रदायात या मात्र गीतेचा प्रचार का होऊ शकला नाही ? का जाणीवपूर्वक हा ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचूच द्यायचा नाही की काय ? हे मला सतत आश्चर्य वाटत आलेले आहे . बरे ही मंत्र( अभंग) गीता माझ्या पाहण्यात पण आहे . वारकरी संप्रदायातील अनेकांना हा ग्रंथ माहीतही नाही .