शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८

विचाराचे चिरंतनत्व

                                 

                              
        विचाराचे चिरंतनत्व

          माणसाला एक गोष्ट कळली पाहिजे ते म्हणजे "त्याला कळत नाही हे त्याला कळले पाहिजे." पण !काय करावे त्याला हेच कळत नाही कि त्याला कळत नाही . नाकळे ते कळे कळे ते नाकळे ।वळे ते नावळे गुरुविण ।। ए. म. हरिपाठ ।। जगत मिथ्या असूनही सत्य वाटते व परमात्मा सत्य असूनही तो सत्य वाटत नाही . जसे जगात एक आंधळा असा आहे कि त्याला जगत दिसत नाही फक्त परमात्मा दिसतो, व दुसरा एक आंधळा आहे ज्याला देव न दिसता जगत दिसते आणि ते सत्य वाटते. " सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे । वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे । कवणा मी शरण जाऊ दृष्टी देई जो निर्मळ ।।.... येथे दृष्टी सुर्ष्टीवाद आहे म्हणजे दृष्टीकाली सृष्टी . ईशसृष्टी आणि जीव सृष्टी असाही एक सुंदर विचार पंचदशीमध्ये आला आहे. असो जगात विचार हा खूप महत्वाचा भाग आहे . विचारला कोणीही नष्ट करू शकत नाही हेही तितकेच खरे आहे. कार्ल मार्क्सने कम्युनिझम सांगितला " दास कॅपिटल" नावाचा ग्रंथ लिहला त्याचा एवढा परिणाम झाला कि संपूर्ण रशिया, चीन हे कम्युनिष्ट झाले म्हणून विचार हि चिरंतन राहणारी बाब आहे. महाराष्ट्रात झालेले संत, विचारवंत त्यांच्या विचाराने समाजात एक वेगळी जागृती आणली . संत ज्ञानेश्वर महाराज ,संत तुकाराम महाराज , संत नामदेव महाराज अगदी संत निळोबाराय आदी संत व आधुनिक कालावधीमध्ये झालेले संत महंत यांनी समजला एक विचार दिला व वराकारी परंपरा अबाधित राहिली कर्मठपणाला या परंपरेत स्थान नाही " चंद्रभागे स्नान । विधी तो हरिकथा ।।" असा सुंदर विधी पंढरीचा आहे , कर्माची कटकट नाही, सोवळे ओवळेपणाचे अवडंबर नाही .
           असा एखदा क्रांतिकारी विचार आला  कि मग मात्र कर्मठ प्रस्थापितांना मात्र हे सहन होत नाही मग अशा विचारवंताना हे लोक विरोध करतात तो विरोध नाना प्रकारचा असतो कधी निंदा करून, कधी प्रलोभन दाखवून, कधी चारित्य्रावर संशय घेऊन, आणि कशानेही जमले नाही कि मग ते त्या विचारवंताला या जगातूनच नाहीसे करतात.
           ग्रीस देशातील महान तत्वेता सॉक्रेटिस , वै . ह.भ.प श्री मामा (सोनोपंत) दांडेकर या सॉक्रेटिसची तुलना आपल्या जगद्गुरू श्री तुकाराम महाराज आणि संत श्री कबीर महाराज यांच्याबरोबर करायचे . या सॉक्रेटिसने आत्म्याचे अमरत्व सांगितले आणि अंधश्रद्धेवर आघात केले.सॉक्रेटिस हा एक थोर शिक्षक गणला जातो. त्याची शिक्षणपद्धत ही वेगळीच होती व तो प्रश्न विचारत-विचारत शिकवे व लोकांकडून उत्तरे मिळवे. "ex duco" चा अर्थ "lead out" होतो जो "education" ह्या शब्दाचा गाभा आहे. उत्तरे "मिळवणे" हे "lead out" किंवा त्यातूनच मार्ग दाखवणे अशा अर्थाने पाहिले तर अशा शिक्षणपद्धतीचे महत्त्व पटते.  पण त्यांचे विचार व आचार तत्कालीन प्रस्थापित कर्मठ लोकांना पटले नाही त्यांनी भरपूर प्रयत्न केले पण सॉक्रेटिसने त्यांना दाद दिली नाही. शेवटी त्यांच्यावर खटला  भरला व त्यावेळी कोर्टात न्यायाधीशाने त्यांना विचारले ," सॉक्रेटिस ! तुम्ही म्हणता कि मला जे कळले ते कोणाला कळले नाही , तुम्हाला काय कळले कि जे इतरांना कळले नाही ? तेव्हा सॉक्रेटिसने सांगितले कि " महोदय ! मला जे कळले आहे ते या लोकांना कळले नाही , तुम्ही म्हणता तुम्हाला काय कळले , तर महाराज ! मला कळत नाही हे मला कळले आहे आणि हेच या लोकांना कळले नाही . अज्ञानाचे ज्ञान याना नाही मला माझ्या अज्ञानाचे ज्ञान झाले आहे . " एवढ्या मोठया तत्ववेत्याला शेवटी देहांताची शिक्षा देण्यात आली . त्यांना हिरकणी खाऊ घालून मारण्यात आले पण त्यांच्या विचारांना ते मारू शकले नाही उलट त्यांचे शिष्य प्लेटो व ऍरिस्टॉटल त्यांनी सॉक्रेटिसची ही प्रश्नावली लिहून ठेवल्यामुळेच ती आज जगाला माहीत आहे असे समजले जाते. त्यांचे विचार पुढे जास्त प्रमाणात प्रसार पावले . तत्ववेता संपवला पण त्याचे तत्वज्ञान मात्र संपवू शकले नाही.  याचप्रमाणे येशू ख्रिस्त , सेंट जोन्स , अशा अनेक विचारवंतांना प्रस्थापितांनी संपवले पण त्यांचे विचार संपवू शकले नाही कारण विचार हे चिरंतन असतात एवढेच मला सांगायचे आहे .
भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डीले
गुरुकुल भागवताश्रम , चिचोंडी(पा)
मो. ९४२२२२०६०३
       

४ टिप्पण्या: