।।
वाचावी ज्ञानेश्वरी ।।
जगातील सर्व श्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपिअर यांचे नाव घेतले जाते.आणि त्यांना "फादर
ऑफ ड्रामा" असेही म्हटले जाते. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये शेक्सपिअर
यांच्या नाटकांची भाषांतरे झाली आहेत. गेली चार शतके शेक्सपिअर यांच्या नाटकांचे
असंख्य प्रयोग जगभर होत असतात. विल्यम शेक्सपिअर यांचा जन्म इंग्लंड देशातील
वॉर्विकशायर परगण्याच्या (काउंटीच्या ) अॅव्हन नदीच्या किनाऱ्यावरील
स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-अॅव्हन या गावात इ.स. १५६४ साली झाला. समजा तुम्ही जर
पर्यटनासाठी इंगलंडमध्ये गेलात आणि तेथील जाणकार माणसाची भेट झाली आणि तुम्ही जर
त्याला सांगितले कि इंग्लडमध्ये बराच फिरलो आणि अमुक बघितले तमुक बघितले "
त्यानंतर तो समोरचा माणूस तुम्हाला विचारतो कि " तुम्ही सगळा इंग्लंड फिरून
बघितला पण काहो ! तुम्ही आमच्या देशातील वॉर्विकशायर परगण्याच्या (काउंटीच्या ) अॅव्हन
नदीच्या किनाऱ्यावरील स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-अॅव्हन या गावात गेला होता का ? ते आमच्या शेक्सपियरचे जन्मस्थान आहे " आपण जर ते बघितले नाही म्हणून
सांगितले तर तो माणूस म्हणतो मग तुम्ही काहीच बघितले नाही . असो हे सांगण्याचे
तात्पर्य त्या लोकांना त्याच्या एका नाटककाराचे किती अप्रूप वाटते . मित्रानो !
जगामध्ये कुठेही तुम्ही जा तुम्हाला मंदिरासाठी खांब दिसतील पण अहमदनगर जिल्यातील
नेवासा हे असे एकमेव गाव आहे येथे फक्त खांबासाठी मंदिर आहे. जगात
अनेक भाषेत जिची भाषांतरे झाली आहेत अशी ज्ञानेश्वरी या खांबाला टेकून
माउली ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवरील टीका म्हणजेच ज्ञानेश्वरी सांगितली आणि
सदचिदानंद बाबा यांनी ती लाऊन घेतली . शके बाराशतें बारोत्तरें । तैं टीका केली
ज्ञानेश्वरें । सच्चिदानंदबाबा आदरें । लेखकु जाहला ।।ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय – ओवी क्र. १८१० माउलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने भगवद गीतेवर मराठीत भाष्य केले
, देशीकार लेणे केले . "माझा मऱ्हाटीचा बोलू कौतुके ।
परी अमृताते पैजा जिंके ।ऐसी अक्षरे रसिके । मेळवीन ।। (ज्ञाने - ६.१४) माउलींनी ग्रंथ सांगितला व सच्चिदानंद बाबांनी
लिहून घेतला . ग्रंथ लेखन गोदावरी तटी नेवासे क्षेत्री झाले . आपणही हा विचार केला
पाहिजे कि "जर तुम्ही महाराष्ट्रात आलात आणि नेवाशाला जाऊन माउलीचे मंदिर
बघतिलेले नाही तर तुम्ही काही बघतिलेले नाही ."

एकनाथ महाराजांनी ग्रंथ शुध्द् केला
अर्थात आजच्या भाषेत ग्रंथाचे संपादन केले . या ग्रंथशुद्धीची तिथी व साल दोन्हीची
नोंद नाथ महाराजांनी केली आहे . ही तिथी आहे भाद्रपद वद्य षष्ठी . ग्रंथ
निर्मितीची तिथी उपलब्ध नसल्याने याच तिथीला ज्ञानेश्वरी जयंती साजरी केली
जाते. बहुकाळ पर्वणी गोमटी । भाद्रपदमास
कपिलाषष्ठी । प्रतिष्ठानीं गोदातटीं । लेखनकामाठी संपूर्ण जाहली ।। – संत एकनाथ महाराजांनी केलेला ग्रंथशुद्धीच्या(संपादन) तिथीचा निर्देश. म्हणून याच दिवशी
ज्ञानेश्वरीची जयंती मानण्याची वारकऱ्यांची परंपरा आहे.
भागवताचार्य
अशोकानंद महाराज कर्डीले
गुरुकुल
भागवताश्रम , चिचोंडी (पा) ता. नगर
मो. ९४२२२२०६०३
गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् ।
उत्तर द्याहटवाउमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् ॥ शुक्लां ब्रह्मविचार सार परमां आद्यां जगद्व्यापिनीं । वीणा पुस्तक धारिणीं नमस्कार अभयदां जाड्यान्धकारापाहां ।। हस्ते स्फाटिक मालीकां विदधतीं पद्मासने संस्थितां । वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धि प्रदां शारदां ।। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीद्रैः । समागत्य तिष्टंतमानंदकदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ।। रणे कृष्णबीभस्तु संवादभूतो रूगीतार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै । कृती निर्मिताः येन च प्राकृतोक्ता समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ।।
ज्ञानं मोहविनाशकं भगवता पार्थाय प्रोक्तं रणे
गुह्यं तत्परं हिताय जगतो यस्यां च स्पष्टीकृतम
ज्ञानेशेन सलीलया विकथिता देशीयभाषासु या
यावच्चंद्र दिवाकरौ विजयतां सा नाम ज्ञानेश्वरी
वसुदेवसुतं देवं कंस चाणूर मर्दनम्। देवकी परमानन्दं कृष्ण वंदे जगदुरुम्॥
भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी ।।
स्वमुखे आपण सांगे तो श्रीविष्णु । श्री गिता हा प्रश्नू अर्जुनेशी ।।
तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे । भय कळीकाळाचे नाही तया ।।
एका जनार्दनी संशय सांडोनी । दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी ।।
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
हटवाधन्य आम्ही तुका देखिला हा अभंग पाहिजे
उत्तर द्याहटवा