शेतकरी आत्महत्या का करतात ?
 |
|
हा मोठा विचार करण्यासारखा प्रश्न आहे . शेतकरी हा या देशाचा कणा आहे . ऋषी संस्कृती आणि कृषी संस्कृति ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत . संत तुलासिदासजी सुद्धा म्हणतात " भुके भजन ना होई गोपाला ।।" उपाशी पोटी भजन सुद्धा होऊ शकत नाही तर बाकीच्या गोष्टींचे काय विचारायचे ! ते अन्न आपला अन्नदाता म्हणजेच शेतकरी पिकवतो तो बळी राजा आहे आणि ह्या बळी राजाला केव्हाच पडली तुडविले आहे . जगदुरू तुकाराम महाराज म्हणतात " तुका म्हणे बळी । जीव दिला पायातली ।।" तर मित्रांनो उपनिषद सांगते कि " अन्नं ब्रह्मेति ।" अन्न ब्रह्म आहे ते पिकविणारा कोण आहे ? कधी विचार करतो का आपण …। उदर भरण नोहे पाविजे यज्ञ कर्म ।। या पोट भरण्याच्या क्रियेला यज्ञ म्हणतात . मग एव्हढे पवित्र कार्य ज्याच्या मुळे होतो तो शेतकरी उपेक्षित राहतोच कसा ? तर त्याचे कारण म्हणजे " राजा कालस्य कारणं ।।" असे म्हटले आहे राज सत्ता याला कारणीभूत असते . आजही ;लोक म्हणतात कि हा दुष्काळ मानव निर्मित आहे म्हणजे काय ? मानवांनी केलेल्या चुकांच प्रायश्चित मात्र जनतेला . असो छांदोग्य उपनिषदात ३-१६-१७ मध्ये असे म्हटले आहे कि मानवी जीवन हे एक प्रकारचा यज्ञच आहे …. त्या यज्ञाची पूर्णाहुती म्हणजे खरे तर ज्ञान द्वारे मोक्ष होय पण दुर्दैव असे कि या शेतकऱ्याला मात्र मधेच या जीवनाची पूर्णाहुती द्यावी लागते . एकतर जमीन थोडीशी त्यातही कुटुंबाचे भरण पोषण करायचे आणि जर अस्मानी सुलतानी दुष्काळ पडला तर मग याचे कंबरडेच मोडून जाते त्यातही मोठे शेतकरी बागायीतदार अल्पभूधारकांच्या सवलीती मधल्या मधेच कधी लाटतात हे काळातही नाही . सरकारी नियमांच्या तावडीतून सुटता सुटता नाकी नवू येतत. पुढारी ताकास तूर लागू देत नाहीत . मोठ्या बगयीतदराने काहीही आत्महत्या केल्याचे ऐकिवात नाही . त्यामुळे हा गरीब शेतकरी कर्ज काढल्याशिवाय पर्याय नाही व ते फेडण्याची ताकत नाही व सावकार, ब्यांका त्याच्या मागे वसुलीचा तगादा लावतात . सरकारी योजना कागदावरच असतात . मंत्री मात्र आपण कसे काम केले याची सेल्फी काढीत पेपरमध्ये बातमी आणण्यात मग्न . मला मोठे आश्चर्य वाटते कि विजय मल्ल्या ९००० कोटी बुडवून परदेशात जातो त्याचे कोणीही काहीही वाकडे करीत नाही . आणि लाखभर कर्ज फेडता न आल्याने आमचा हा गरीब शेतकरी मात्र आत्महत्या करतो . कारण तो माल्ल्यासारखा गेंड्याच्या कातडीचा नाही . दुष्काळ हे तर काही व्यापार्यांना इष्टापत्ती असते . साठेबाजांनी डाळीचे भाव वाढवून ठेवले . शेतकऱ्याला मात्र तो वाढीव भाव मिळत नाही पडेल भावात त्याच्याकडून माल विकत घ्यायचा आणि वदवून विकायचा . शेतकऱ्याच्या आत्महत्येचा मात्र राजकीय लाभ उठविण्यासाठी मंत्री , पुढारी यांची स्पर्धा , फोटो , पेपरबाजी सर्व बघायला मिळते . यालाच मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणे म्हणतात .
आता शेतकर्यांनी सावध व्हावे आणि विचाराने व्यवहार करावेत आपला माल आपणच विकावा व आपल्या मालाची किंमत आपण ठरवावी … मधल्या दलालाला बाजूला काढावे , थोडासा त्रास होईल पण ठरवले तर शक्य आहे . कर्ज झाले म्हणून आत्महत्या करू नये अरे ! हे व्यापारी , मंत्री करोडोने कर्ज बुडवितात . त्यांचे कोनीच काही वाकडे करीत नाहीत त्यामुळे घाबरू नका … कर्ज नाही फेडता आले तर काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा .वेगवेगल्या संस्था , समाजाभिमुख लोक तुम्हाला मदतीला आता येत आहेत . आपल्या पाठीमागच्या कुटुंबाचा विचार करावा . आपल्या मरणाने आपण सुटतो असे आपल्याला वाटते पण ते योग्य नाही कारण आत्महत्या हे घोर पाप सांगितले आहे आणि हे पाप करून नरकात जाण्यापेक्षा व मधेच पळपुट्याप्रमाणे आत्महत्या करण्याआधी विचार करावा कि तुमच्या मागे तुमची पत्नी , मुले- मुली कसे दिवस काढतील ?त्यांचे शिक्षण , विवाह , त्यांना मोठे करणे हि आपली जबाबदारी आहे याचाही विचार करावा . भगवत गीतेमध्ये अर्जुन युद्धाला घाबरला आणि भगवंताला म्हणाला" मी या कौरवांच्या बरोबर लढणार नाही त्यापेक्षा भिक्षा मागणे पत्करीन "तेव्हा भगवंतांनी त्याला जबाबदारीची जाणीव करून दिली आणि म्हणाले कि "कर्म करावेच लागेल कदाचित ते प्रतिकुलहि असू शकते पण असे जीवनात आपल्या वाट्याला आलेले कर्म यथासांग जो पार पडतो तोच खर मनुष्य आहे नाही तर पशुमध्ये आणि त्याच्यात काय फरक राहिला ?ह्यालाच कर्मयोग म्हणतात . " शस्त्र सांगते कि " नैसर्गिक मृत्यू आल्याशिवाय माणसाने मरणाचा विचार सुद्धा करू नये " १०० वर्षे जीवन जगण्याची कामना करण्यास उपनिषद सांगते . तुमच्यासाठी समाजात काही चांगले लोक सुद्धा आहेत फक्त तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत आणि कोणी नाही आले तरी भगवंतावर विश्वास ठेवला तर तो निश्चित मदतीला कोणाच्याही रूपाने उभा राहतो . असो जबाबदारीची जाणीव ठेवा आणि नाउमेद होऊ नका . हे हि दिवस जातील असे लक्षात ठेऊन . प्रयत्न प्रयत्न प्रयत्न हाच आपला देव आहे . अमोल असा नरदेह वृथा वाया घालवू नका .
अशोकानंद महाराज कर्डिले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा