बुधवार, २७ एप्रिल, २०१६

छावणी -पशुधन वाचविण्याचे साधन कि ….?

                        
   
              मित्रांनो मी मागील वर्षी डिसेंम्बरमध्ये ऑस्ट्रेलियाला गेलो होतो तेथे मेलबर्न येथे माझ्या मुलाकडे राहिलो होतो दोन महिने मी जवळ जवळ बारा हजार किलोमीटर प्रवास केला व तेथील परिस्थती जाणून घेण्याचा प्रयत्न केला . मी जेव्हा प्रवासास निघत असे तेव्हा आवर्जून तेथील पशुधन कसे  सांभाळतात ते पाहत असे . तेथे जवळ जवळ सर्वत्र हिरवळ दिसते . मोठमोठे शेतीचे प्लॉट आणि त्यात वेगवेगळ्या फळ बागा , व पिके दिसत होते . फार छान वाटायचे . विशेष म्हणजे तेथे सर्व प्रकारच्या पशूंची फार काळजी घेतलेली दिसत होती . पैकी गाईंची ठेवलेली निगा व त्यांची घेतलेली योग्य काळजी , व्यवस्था बघितल्यानंतर असे वाटले कि आपल्याकडे का नाही अशी व्यवस्था होऊ शकत ? तेथे साधारणपणे १०० ते २०० एकरमध्ये विस्तीर्ण अशा मैदानात फक्त गवत लावलेले आणि त्यामाध्जे एक छानपैकी शेततळे व त्या मैदानात हजाराच्या आसपास गाई मोकळ्या चरण्यासाठी सोडल्याल्या त्यांच्या मानेवर दावे नाही . सभोवताली तारेचे कुंपण व त्यातून वीज सोडलेली कि ज्यामुळे बाहेरचा कुणी आत येत नाही व आतले जनावरे बाहेर जात नाहीत सर्व गाया मुक्तपणाने तेथे चरतांना दिसतात होत्या . व अंगाने धष्टपुष्ट अशा दिसत होत्या व तेथे दुधाचे वेगवेगळे पदार्थांची रेलचेल दिसते . मौल्मधे चीज,  श्रीखंड, दही, व दुध तर विचारू नका त्याचे प्रकार म्हणजे milk with vitamin- A , B , C  व milk  with full cream , half cream असे प्रकार ते बघितल्यानंतर मला आपल्याकडचे      पशुधन व त्याची दुरवस्था आठवायची . 
               सांगायचा मुद्दा असा कि आपल्या महाराष्ट्रात जनावरांची फारच दुरवस्था आहे . गोहत्या बंदी कायदा असून सुद्धा गाईंची हत्या झाल्याशिवाय राहत नाही . आजच सकाळला बातमी वाचली ३०० किलो मांस संगमनेरमध्ये सापडले . शेतकरी रस्त्यावर गाई सोडू लागले आहेत , जनावरांच्या बाजारात कमी भावात जन्वरांची विक्री सुरु आहे , लपून छपून कसाईच हे जनावरे विकत घेतात . दुष्काळामुळे पाणी नाही, चारा नाही …. चाराडेपो सुरु करा म्हणून शेतकऱ्यांची मागणी आहे परतू शासन लक्ष देत नाही आणि छावणीसाठी एवढे जाचक नियम व अटी  करून ठेवल्या आहेत कि कोणी छावणी सुरु करू इच्छित नाही . गम्मत म्हणजे छावणीतील जन्वारांच्या शेणाचे देखील ऑडीट होणार आहे आणि त्या शेणाची किमत ठरविली जाऊन छावणी मालकाच्या  बिलातून ती रक्कम कापून घेतिली जाणार आहे त्यामुळे काय होईल कोणी किती" शेण खाल्ले " हे उघड होणार ह्या सर्व प्रक्रियेत जीव जाईन तो या मुक्या जनावरांचा  व शेतकर्यांचा . तेव्हा सरकारने याकडे गांभीर्याने बघायला हवे . . आता ज्या छावण्या आहेत त्या अतिशय थोड्या आहेत . नगर तालुक्यातील जनावरे  आष्टी तालुक्यात नेले जातात …छावणी म्हणजे एक छोटेशे गावच असते . तेथील आरोग्याचा प्रश्न सुद्धा गंभीर बनतो त्याकरिता चारा  डेपो जर सुरु झाले व शेतकर्यांना चारा घरी नेता आला तर शासनाचा बराच भाग हलका होईल .. असो काहीही चांगले उपाय करून हे पशुधन वाचवणे महत्वाचे आहे . विविध तज्ञ मंडळी शासनात आहे त्यांनी हे तातडीने कारवाई करावी एवढीच माफक अपेक्षा . 

अशोकानंद महाराज कर्डिले

मंगळवार, २६ एप्रिल, २०१६

शेतकरी आत्महत्या का करतात ?

                      


                       हा मोठा विचार करण्यासारखा प्रश्न आहे . शेतकरी हा या देशाचा कणा आहे . ऋषी संस्कृती आणि कृषी संस्कृति ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत . संत तुलासिदासजी सुद्धा म्हणतात " भुके भजन ना होई गोपाला ।।" उपाशी पोटी भजन सुद्धा होऊ शकत नाही तर बाकीच्या गोष्टींचे काय विचारायचे ! ते अन्न आपला अन्नदाता म्हणजेच शेतकरी पिकवतो तो बळी राजा आहे आणि ह्या बळी राजाला केव्हाच पडली तुडविले आहे . जगदुरू तुकाराम महाराज म्हणतात " तुका म्हणे बळी । जीव दिला पायातली ।।" तर मित्रांनो उपनिषद सांगते कि " अन्नं ब्रह्मेति ।" अन्न ब्रह्म आहे ते पिकविणारा कोण आहे ? कधी विचार करतो का आपण …। उदर भरण नोहे पाविजे यज्ञ कर्म ।। या पोट भरण्याच्या क्रियेला यज्ञ म्हणतात . मग एव्हढे पवित्र कार्य ज्याच्या मुळे होतो तो शेतकरी उपेक्षित राहतोच कसा ? तर त्याचे कारण म्हणजे " राजा कालस्य कारणं ।।" असे म्हटले आहे राज सत्ता याला कारणीभूत असते . आजही ;लोक म्हणतात कि हा दुष्काळ मानव निर्मित आहे म्हणजे काय ? मानवांनी केलेल्या चुकांच प्रायश्चित  मात्र जनतेला . असो छांदोग्य उपनिषदात ३-१६-१७ मध्ये असे म्हटले आहे कि मानवी जीवन हे एक प्रकारचा यज्ञच आहे …. त्या यज्ञाची पूर्णाहुती म्हणजे खरे तर ज्ञान द्वारे मोक्ष होय पण दुर्दैव असे कि या शेतकऱ्याला मात्र मधेच या जीवनाची पूर्णाहुती द्यावी लागते . एकतर जमीन थोडीशी त्यातही कुटुंबाचे भरण पोषण करायचे आणि जर अस्मानी सुलतानी दुष्काळ पडला तर मग याचे कंबरडेच मोडून जाते त्यातही मोठे शेतकरी बागायीतदार अल्पभूधारकांच्या सवलीती मधल्या मधेच कधी लाटतात हे काळातही  नाही . सरकारी नियमांच्या तावडीतून सुटता सुटता नाकी नवू  येतत. पुढारी ताकास तूर लागू देत नाहीत . मोठ्या बगयीतदराने काहीही आत्महत्या केल्याचे ऐकिवात नाही . त्यामुळे हा गरीब शेतकरी कर्ज काढल्याशिवाय पर्याय नाही व ते फेडण्याची ताकत नाही व सावकार, ब्यांका त्याच्या मागे वसुलीचा तगादा लावतात . सरकारी योजना कागदावरच असतात . मंत्री मात्र आपण कसे काम केले याची सेल्फी काढीत पेपरमध्ये बातमी आणण्यात मग्न . मला मोठे आश्चर्य वाटते कि विजय मल्ल्या ९००० कोटी बुडवून परदेशात जातो त्याचे कोणीही काहीही वाकडे करीत नाही . आणि लाखभर कर्ज फेडता न आल्याने आमचा हा गरीब शेतकरी मात्र आत्महत्या करतो . कारण तो माल्ल्यासारखा गेंड्याच्या कातडीचा नाही . दुष्काळ हे तर काही व्यापार्यांना इष्टापत्ती असते . साठेबाजांनी डाळीचे भाव वाढवून ठेवले . शेतकऱ्याला मात्र तो वाढीव भाव मिळत नाही पडेल भावात त्याच्याकडून माल विकत घ्यायचा आणि वदवून विकायचा .  शेतकऱ्याच्या आत्महत्येचा मात्र राजकीय लाभ उठविण्यासाठी मंत्री , पुढारी यांची स्पर्धा , फोटो , पेपरबाजी सर्व बघायला मिळते . यालाच मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणे म्हणतात .
          आता शेतकर्यांनी सावध व्हावे आणि विचाराने व्यवहार करावेत आपला माल आपणच विकावा व आपल्या मालाची किंमत आपण ठरवावी … मधल्या दलालाला बाजूला काढावे , थोडासा त्रास होईल पण ठरवले तर शक्य आहे . कर्ज झाले म्हणून आत्महत्या करू नये अरे ! हे व्यापारी , मंत्री करोडोने कर्ज बुडवितात . त्यांचे कोनीच काही वाकडे करीत नाहीत त्यामुळे घाबरू नका … कर्ज  नाही फेडता आले तर काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा .वेगवेगल्या संस्था , समाजाभिमुख लोक तुम्हाला मदतीला आता येत आहेत . आपल्या पाठीमागच्या कुटुंबाचा विचार करावा . आपल्या मरणाने आपण सुटतो असे आपल्याला वाटते पण ते योग्य नाही कारण आत्महत्या हे घोर पाप सांगितले आहे आणि हे पाप करून नरकात जाण्यापेक्षा व मधेच पळपुट्याप्रमाणे आत्महत्या करण्याआधी विचार करावा कि तुमच्या मागे तुमची पत्नी , मुले- मुली कसे दिवस काढतील ?त्यांचे शिक्षण , विवाह , त्यांना मोठे करणे हि आपली जबाबदारी आहे याचाही विचार करावा . भगवत गीतेमध्ये अर्जुन युद्धाला घाबरला आणि भगवंताला म्हणाला" मी या कौरवांच्या बरोबर लढणार नाही त्यापेक्षा भिक्षा मागणे पत्करीन "तेव्हा भगवंतांनी त्याला जबाबदारीची जाणीव करून दिली आणि म्हणाले कि "कर्म करावेच लागेल कदाचित ते प्रतिकुलहि असू शकते पण असे जीवनात आपल्या वाट्याला आलेले कर्म यथासांग जो पार पडतो तोच खर मनुष्य आहे नाही तर पशुमध्ये आणि त्याच्यात काय फरक राहिला ?ह्यालाच कर्मयोग म्हणतात . " शस्त्र सांगते कि " नैसर्गिक मृत्यू आल्याशिवाय माणसाने मरणाचा विचार सुद्धा करू नये " १०० वर्षे जीवन जगण्याची कामना करण्यास उपनिषद सांगते . तुमच्यासाठी समाजात काही चांगले लोक सुद्धा आहेत फक्त तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत आणि कोणी नाही आले तरी भगवंतावर विश्वास ठेवला तर तो निश्चित मदतीला कोणाच्याही रूपाने उभा राहतो . असो जबाबदारीची जाणीव ठेवा आणि नाउमेद होऊ नका . हे हि दिवस जातील असे लक्षात ठेऊन . प्रयत्न प्रयत्न प्रयत्न हाच आपला देव आहे . अमोल असा नरदेह वृथा वाया घालवू नका . 


अशोकानंद महाराज कर्डिले

सोमवार, २५ एप्रिल, २०१६

।। ध्यान करिता गळाले मन ।।(१)

                           

                 विदेही संत श्री संतामाई ह्या कोळी समाजात जन्मल्या होत्या . परमार्थाचे संस्कार दुर्मिळ तरीही पूर्वसंचिताचा ठेवा म्हणून त्यांना आनंद संप्रदायाचे   ब्र्हमाज्ञानी सद्गुरु श्री साख्यानंद महाराजांचा अनुग्रह मिळाला . आणि गुरुकृपेने त्यांना अभंग रचना स्फुरू लागली त्या सहज काव्यात्मक भाषेत रचना करीत आणि त्यांचे शिष्य ते क्रमश: लिहून घेत असत . त्यांचे एकूण २५०० अभंग प्रसिध्द आहेत . विशेष म्हणजे त्या शाळेत कधीही गेल्या नव्हत्या तरीही संस्कारी बुद्धीतून तत्वज्ञानात्मक रचना पाझरू लागली …. तरीही साहित्यिकांचे याकडे लक्ष नाही कारण संतामाई या सर्व सामान्य समाजातील आहेत त्यामुळेही अभिजात साहित्यिक याचा विचार करीत नसावेत . त्यांच्या अभंगात वेदांत सहज आणि सोप्या भाषेत सांगितलेला आपल्याला आढळतो . परिचयातील दृष्टांत सांगून सिद्धांत पटविण्याची त्यांची हातवटी विलक्षण आहे . त्यांच्या अभंगामध्ये मानसशास्त्रीय विवेचन सुद्धा आढळते . तसेच ध्यान साधनेविषयी सुद्धा मार्गदर्शन असते कारण सर्व ज्ञान हे ध्यानाच्या माध्यमातूनच येते म्हणून ध्यान साधना हि महत्वाची ठरते . उदहरण म्हणून आपण एक अभंग पाहूयात । 
ध्यान करिता गळाले मन । नाही देहाची आठवण ।।१।।
सापडली गुरुकिल्ली । स्वरुपात बुडी दिली ।।२।।
बाहेर निघाया नको वाटे । झाली आनंदाची भेट ।।३।।
सखयाकृपे  संती म्हणे । नका हिंडो आडराने ।।४।।

ध्यान साधनेकरीता यम , नियम ,आसन , प्राणायाम , प्रत्याहार , धारणा ,ध्यान समाधी . हि अष्टांग योगाची सामुग्री लागतेच पण सहज साधनेकरीता अष्टांग योगातील सर्व सामुग्री असावीच असा आग्रह नाही . तुम्ही सहज आसन घालून पाठीचा कान ताठ ठेवून आणि स्वसोच्छासाकडे लक्ष केंद्रित करून सोहम भाव करून त्याकडे लक्ष द्यावे . तो मंत्र म्हणजे अजपाजप ," अजपाजप उलट प्राणाचा । तेथेही मनाचा निर्धारु असे ।।" -हरिपाठ . अशा प्रकारे तुमचे ध्यान सिध्द होऊ लागले कि मग तुमचे मन हे मनपना धरीत नाही त्याचे संकल्प विकल्प हळू हळू बंद होतात . मनाचे देह तादात्म्य सुटते व हा अनुभव म्हणजेच गुरूची किल्ली आहे कि ज्यामुजले आपण स्वरुपात लीन होऊन जातो व पुन्हा त्या सुखातून बाहेर निघू वाटत नाही सखयाची सन्ति म्हणते कि हा इतका सोपा मार्ग सोडून आडरानात फिरू नका . 

 …… क्रमश: